Thursday, 12 October 2017

भाग -२ Dilemma and Contemplation

भाग -२
पैसा तर महत्वाचा आहेच आणि कोणी म्हणत असेल की तसे काही नाही, पैश्याशिवाय जगात बरेच काही साध्य होवू शकते,  तर ती व्यक्ती गडगंज श्रीमंत तरी असेल (जमीन ,संपत्ती ) किंवा तिचे समाजातील स्थान(पिढीजात ) उच्च मध्यम वर्गीयांच्या श्रेणीतील तरी असेल, ह्या दोन प्रकारच्या लोकांनाच असे बोलण्याची मुभा आहे.
बाकी ज्यांच्या कडे असे काहीच नाही, ज्यांचा जन्म,शिक्षण आणि नोकरी सगळेच मुंबईतील आणि ज्यांना स्वतःचे कष्ट हीच शिदोरी त्यांना पैसा मुंबईत किती गरजेचा आहे हे चांगलेच माहित असते.
 निदान स्वतःचे हक्काचे, चांगल्या सोसायटी मधले घर ,एक बजेट ४व्हिलर घेण्या इतपत (किंवा हवे तेंव्हा ओला/उबेर ने प्रवास करण्या इतपत) तरी श्रीमंत(?!!) ह्या मुंबईत असलेच पाहिजे. 
नाहीतर मग आहेच, घामेजलेल्या जीव गुदमरणाऱ्या (अणि क्वचित प्रसंगी प्राणावर बेतणाऱ्या ) गर्दीतून केलेला बस किंवा ट्रेनचा प्रवास. सकाळी सकाळी वैऱ्या वरही येऊ नये अशी 'चाळीतल्या common toilet' ची  सफर आणि प्रत्येक गोष्टीचे गगनाला भिडलेले दर! निम्न मध्यम वर्गीय होवून रहाणे मुंबईत शाप आहे.

तर एका मुंबईकराची हीच व्यथा आहे की मुंबईत सुखाने जगण्यासाठी उर फुटे पर्यंत काम करायचे, घडयाळाच्या काट्यावर नाचायचे. त्यातूनच मग कधी कधी आजार पण आले कि आपण कसे निसर्गा पासून दूर झालोय, ऑफिस parties किंवा family गेट together च्या नावा खाली आपण कसे वीकेंड्स ना आपल्या शरीरावर जंक फूड लादतोय आणि त्यातून भरीस भर म्हणून ,विषारी chemicals ची फवारणी केलेला भाजी पाला व फळे खाऊन शरीरावर दूरगामी परिणाम  झालेली बरीचमाणसे आपल्या आजू बाजूला कशी वावरत आहेत. हे आणि अशांसारखे असंख्य विचार मनात गर्दी करायचे.
 Personal आणि professional  life ह्यांचा सुवर्ण मध्य साधता आला तर?!. सिमेंट काँक्रीटच्या जंगला पासून दूर , निसर्गाच्या सानिध्ध्यात रोज राहता आले तर ?!
आता मुंबई बाहेर जाऊन राहणे हा एकच पर्याय दिसत होता. 

गोव्याला शिफ्ट होऊया का किंवा लाडक्या कोकणात ? मस्त समुद्र किनारी छोटेसे घर बंधू आणि राहू.
अहाहा , काय सुंदर कल्पना . पण मग पोटापाण्याचे काय, नोकरीला पूर्ण राम राम ठोकायचा का? गावी मुंबई सारख्या सोयी -सुविधा थोडीच उपलब्ध होणार आहेत. ?
 मुलीच्या शिक्षणाचे काय, तिचे इतर छंद वर्ग, आणि आता तिला मुंबईतील वातावरणात राहणाऱ्या मित्र मैत्रिणींची सवय झाली आहे. गावातील शाळेत ती जुळवून घेऊ शकेल का?
 दोघांचे आई-वडीलही  इकडे आणि आपण कोकणात किंवा गोव्याला कसे राहून चालेल. इथे निदान ते आपल्या कडे आणि आपण त्याच्या कडे जेव्हा हवे तेंव्हा जाऊ येऊ शकतो. एवढ्या लांब राहायला गेल्यावर ते शक्य होणार नाही. 
मग मुंबई जवळच्या खेडेगावात राहता येते का पाहू ह्या वर दोघांचे शिक्का मोर्तब झाले.
 इकडे फेसबुक आणि Google च्या माध्यमातून मला "Homeschooling" ह्या मुलांना शिकवण्याचा नव्या पर्यायाची तोंड ओळख झाली. घरी राहून , निसर्गाच्या सान्निध्यात आपण आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करून घेऊ शकतो ही कल्पनाच मनाला मोहून टाकत होती.
मग सुरु झाला पर्याय शोधण्याचा प्रवास.

क्रमशः

2 comments: