आता ह्या माळरानी बाग फुलवण्याचा आम्ही चंग बांधला.
पप्पांच्या ओळखीच्या BSC Agri. consultant ला मदतीला घेतले. नेट वरून तो पर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक (indigenous) वनस्पती, झाडे ह्या बद्दल भरपूर माहिती मिळवली.
Mono-cropping आणि Chemically loaded farming करायचे नाही हे आधी पासूनच ठरवले होते.
Multi Story agroforestry वर भर देण्याचे निश्चित केले.
सर्वात आधी तारेचे (Pole and barbed wire fence) कुंपण घालून घेतले. खरे तर झुडुपांचे (मेंदी, निवडुंग इ. ) नैसर्गिक कुंपण घालायचे होते, पण कधी कधी budget च्या आणि वेळेच्या बंधनात राहून आपले काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर काही अप्रिय गोष्टी करणे भाग पडते .
आपल्या मुख्य ध्येया पर्यंत एक मार्ग जातो, त्या मार्गावरील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपण ठरविल्या तशाच दर वेळी होतील असे नाही, तरी त्या कडे दुर्लक्ष करता आले पाहिजे; Pole and barbed wire fence घालून घेताना हे प्रथमतः उमगले. नैसर्गिक कुंपण घालणे हे आमच्या तत्वाला (शक्य तितके नैसर्गिक आणि external resources चा कमीत कमी वापर ) शोभेल असेच होते. पण ते जर पूर्ण जागेला घातले असते तर, त्या झुडुपांची वाढ होई पर्यंत त्यातून गुरे-ढोरे, भटके कुत्रे, शेळया आत शिरून लावलेल्या झाडांचे नुकसानच अधिक झाले असते. म्हणून maintenance, money and manpower ह्याचे गणित जुळवून Pole and barbed wire fencing घालण्याचे आम्ही ठरवले. पुढे अनुभवाने, नुसत्या barbed wire fencing ऐवजी chain linked fencing घालणे गरजेचे आहे हे उमजले आणि दुसऱ्या वर्षी chain linked fencing घालून घेतले. काही गोष्टी अनुभवातूनच शिकता येतात.
आम्ही landscaping चा एक जुजबी आराखडा तयार केला.
आम्ही landscaping चा एक जुजबी आराखडा तयार केला.
मला अजूनही तो दिवस लख्ख आठवतोय, झाडे लावण्यासाठी मजूर आणि आपण मिळून खड्डे खणू म्हणून
आम्ही एक खड्डा खणायला सुरुवात केली, पण आमची जमीन इतकी मुरमाड आहे आणि त्यात शारीरिक श्रमाची वानवा त्या मुळे जवळ जवळ ३ तास झाले आम्ही दोघे एक खड्डा खणत होतो. बरे, तो ही केवळ निम्माच खणून झाला. मग पुन्हा एकदा काळ-काम-वेगाचे गणित करून बाकीचे सगळे खड्डे JCP लावून खणून घ्यायचे ठरले. त्यातही पुढे गम्मत वाढून ठेवली होती. पुढील weekend पर्यंत सगळे खड्डे व्यवस्थित खणून झाले असतील म्हणून अति उत्सहाने आम्ही जागेवर भेट द्यायला आलो आणि बघतो तर काय! काही काही खड्डे २*२ चे न होता , ५*५ चे झाले होते.
ते 'आ वासून ' बघणारे खड्डे जणू आम्हाला विचारात होते "आता तुम्हाला खाऊ की गिळू ?"
त्याचे झाले असे, जमिनीतले काही काही दगड इतके मोठे होते कि खड्डेखणताना, ते दगड बाहेर काढल्यामुळे मूळ खड्ड्यांचा आकारच वाढला होता. आता ते खड्डे परत मजुरांकरवी भरून घेतल्याशिवाय पर्याय न्हवता.
मग पुढील ३ दिवस तेथेच राहून खड्डे मना जोगते करून घेतले.
मग पुढील ३ दिवस तेथेच राहून खड्डे मना जोगते करून घेतले.



No comments:
Post a Comment