घर बांधण्याबरोबरच, माळरानाचा कोरा canvas आम्हाला सतत खुणावत होता.
कधी कधी कामाचा काहीच अनुभव नसणे फायदेशीर असते, ह्याची अनुभूति ह्या canvas वर 'निसर्ग चित्र' चितारताना आली.
जेंव्हा तुमची पाटी पूर्ण कोरी असते तेंव्हा तुमचे मन नविन गोष्टी शिकायला आणि प्रत्यक्षात उतरवायला उत्सुक असते. (कारण,तेंव्हा अपयशी अनुभवांमुळे अतिरिक्त चिंता करण्याची सवय मनाला जडलेली नसते. ) .
Monocropping, ज्या मध्ये एकाच प्रकारचे पीक घेतले जाते त्या पद्धतीची शेती करायची न्हवती. कारण त्यासाठी शेतीचे सखोल ज्ञान, अनुभव आणि वेळ ह्या गोष्टी पाहिजे आणि दुसरे असे कि आता पर्यंत permaculture, पाळेकरांचे zero -budget natural farming आणि फुकुओका बाबाचे natural farming ह्या मधून जी माहिती मिळाली होती, त्या नुसार Multistory agroforestry आमच्या साठी योग्य असल्याची खात्री पटली होती. वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांमुळे (पिकांवरील कीड, बेभरवशाचा पाऊस, तापमान वाढ) होणारे शेतीचे नुकसान ह्या पद्धतीमुळे नियंत्रणात राहते. जैवविविधता जतन केली तर आणि तरच निसर्ग प्रसन्न रहातो आणि अर्थातच आपणही शाश्वत आनंद उपभोगू शकतो. अजूनही एक विचार मनात रुंजी घालत होता तो म्हणजे, आपल्या बालपणी जी विविध प्रकारची फुले-फळे आपल्याला पाहायला मिळाली, त्या सर्वांचे संगोपन आपण ह्या माळरानी करावे.
ठरले तर मग, विंड ब्रेकिंग साठी 'कदम्ब' , 'Mangium- ऑस्ट्रेलियन साग' , 'बहावा' ह्या झाडांची निवड केली. 'गुलमोहोर','नीलमोहोर' , 'कडुनिंब', 'करंज', 'कांचन','बेलं', 'रेन-ट्री ' सीता-अशोक, नारळ अशी मोठी झाडे परिघावरती लावली.

आंबा, पेरू, फणस (jack fruit), काजू, चिकू(sapota),जांभूळ (jamun), जांब (water-apple), सीताफळ, रामफळ, अननस, डाळिंब,आवळा, शेवगा ही फळ झाडे आणि जाई, जुई , मोगरा, चाफा, बकुळ, पारिजातक, झेंडू, अनंत , तगर, मधू-मालती, चमेली, शेवंती, गुलाब, जासवंद , कृष्ण कमल ही फुल झाडे त्यांच्या नवीन घरी विराजमान झाली.








कोरा कॅनव्हास जेव्हा निसर्ग रूपाने हिरवं गार रंगी बेरंगी रंगांनी नैसर्गिक रीत्या भरून पावलं ... हे अद्वितीय आहे आणि काळाची खरी गरज आहे.
ReplyDelete